Wed. Apr 9th, 2025

कामठा येथील रविदास मंदिर सर्व समाजाचे प्रेरणा केंद्र व्हावे-चंद्रप्रकाश देगलूरकर

Spread the love

अंबुज प्रहार प्रतिनिधी
नांदेड : कामठा खुर्द ता.जि.नांदेड येथील मुख्य रस्त्यावरील संत शिरोमणी गुरु रविदासजी महाराज यांचे निर्माणाधिन मंदिर हे सर्व समाजाचे प्रेरणा केंद्र व्हावे,अशी अपेक्षा अखिल भारतीय गुरु रविदास समता परिषदेचे नेते इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर यांनी व्यक्त केली आहे.

गुरु रविदास मंदिराच्या कामठा खु.येथील जागेचा भूमिपूजन सोहळा रविवार,दि.९ मार्च २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता इंजि.चंद्रप्रकाश देगलूरकर, व्यंकटराव दुधंबे यांसह आदी मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला.गावातील प्रतिष्ठित नागरिक दिलीप पाटील पुयड हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
आपल्या मनोगतात इंजि.देगलूरकर पुढे म्हणाले की,भूमिपूजन झाले की लगेच बांधकाम सुरु करुन एका वर्षात मंदिर व सभागृह उभारण्यात यावे.येणारी गुरु रविदास जयंती या सभागृहात साजरी करता यावी. यासाठी सर्व समाज बांधवांना आपापल्या परिने जास्तीत जास्त त्याग करावा लागणार आहे व समाजाने संघटित राहणे हे देखिल आवश्यक आहे.तर व्यंकटराव दुधंबे यांनी भाषणबाजीपेक्षा प्रत्यक्षात कृती कार्यक्रम राबविण्यावर भर दिला. या निर्माणाधिन मंदिराच्या कामासाठी एक लाख रुपयांचे बांधकाम साहित्य लगेच देत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली.गोविंद जानोळे(उपसरपंच),राजू केशवराव पुयड(उपसरपंच),पत्रकार आनंद सोनटक्के,पत्रकार गंगाधर सोनटक्के,श्रीराम गोरे,डाॅ.कैलाश भाडेकर,सतीष गोवंदे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

तसेच सदरील सोहळ्याच्या यशस्वितेसाठी राहुल गोरे,प्रकाश गोरे, अशोक गोरे,राजेश गोरे,धनंजय गोरे,पवन गोरे,नागेश गोरे,सचिन गोरे,रमेश भाडेकर,सचिन भाडेकर,मारोती भाडेकर,शिवाजी भाडेकर,किशनराव गोरे,विकास गोरे यांसह आदिंनी परिश्रम घेतले. तर या सोहळ्याचे सुरेख असे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन आनंद भाडेकर यांनी केले.बहुसंख्येन समाज बांधव व गावकऱ्यांची उपस्थिती असलेल्या या सौहळ्याची सांगता प्रसादरुपी अल्पोपहाराने करण्यात आली.


Spread the love

Google Advertisement

ताज्या बातम्या

error: परवानगी शिवाय बातमी कॉपी करू नये. हा कायद्याने गुन्हा आहे !